वणीच्या सप्तश्रुगी भवानीची पूजा कोणी करायची
हा तंटा सुलतानी ठाणेदाराकडे जात होता. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुलतानाच्या
दैवतांची पूजा-अर्च्या, नवस-सायास आणि उरूस- जुलूस मनोभावे
सुरु केले होते.आपल्या पोराबाळाची नावे सुलतानराव, पिराजी,फकीर्जी, शेखोजी अशी ठेवायला सुरवात
केली होती. वाईच्या एका धर्ममार्रतनडाचे नाव होते,विश्वनाथ भट्ट सुलतान.
वर्षानुवर्ष
मोगलानच्या स्वार्या दक्षिणेस होत होत्या.बादशहाच्या स्वार्या म्हणजे कत्तली जाळपोळ, शेतीची, संसाराची
माती.हाहाकार.सर्वस्वा बरोबर अब्रू लुटली जात होती.तारुण्य आणि सौंदर्य
महाराष्ट्रातल्या लेकी सुनांचे अपराध ठरावेत.कोणाही हयवानाने घरात शिरावे, कोणालाही ठार मारावे,अब्रू लुटावी.हंबरडा ऐकालाही वाली नाही.
लोक
वैतागले होते,सैतानी अत्याचार
सुरूच होते.तरुणींच्या, अर्भकांच्या, वृद्धांच्या अक्रोशानी
काळपण, ओशाळला,सर्वोतोपरी
हानी होत होती, मरत होती
मराठ्यांनची जवान पोरे.कोणत्या ना कोणत्या सुल्तानासाठी ,शूर मराठे लढताहेत, मरत आहेत. कुणी निजामासाठी तर कुणी आदिल्शासाठी लढतो पण आपल्या बायका मुलांची बाजू घेऊन कोणीच
लढायला तयार नव्हते.या बादशाहीतून त्या बादशाहीत जाणे ,चाकरी करणे, स्वाभिमान नाही, कुलाशिलाची चाड नाही, अब्रुचि चीड
नाही, लाचार,गुलाम स्वार्थी मने. यवनी जुलमी, पापी,व्यभिचारी अत्याचारापुढे झुकेल तो स्वामी भक्त.
बादशाही जुल्मांची रास वाढत होती.ब्राह्मणाचे
सोवळे -ओवळे, क्षत्रीयांची
लाचारी,वैशानची लांडी-
लबाडी कमी होत नव्हती.सामान्य जणांना कोणी वाली नव्हता.नाथाना हे पाहवत नव्हते. तळमळीने आध्यातमातून
जागआण्याचे काम
करत होते.वासुदेवाची, वाघ्य्यामुरलीची, रोडक्याची गाणी गात होते,भारुड करत
होते.शिमग्याची बॉम सुद्धा तळमळून मारत होते.
आदि शक्तीला आक्रोश करून हाक मारत होते,बये दार
उघड , बये दार उघड ,
अलाक्ष्पूर भवानी बये दार
उघड , माहूर लक्षीमी बये दार उघड ,
कोल्हापूर लक्षीमी बये दार
उघड , तुळजापूर लक्षीमी बये
दार उघड ,
कन्नड लक्षीमी बये दार
उघड ,पातळ लक्षीमी बये
दार उघड ,
पंढरपूर निवासनी बये दार
उघड , बये दार उघड .
तू राम होऊन रावणास मारलेस, हिरण्यकश्पास
फाडलेस बये दार उघड .
जिजाई शिवनेरी शिवाइच्या सहवासात काळ क्रमित
होती. जिजाईला
दास्यत्वाची कल्पना सहन होत नव्हती, सोसवत नव्हती, तिला स्वताचे राज हवे होते.हवा होता आपला झेंडा, आपला सेनापती, आपला प्रधान.या देशावर राज्ज करतील आमचे सार्वमत चंद्र-सूर्य आमचा राजा.
शके १५५१ शुक्ल नाम संवतसारे,फाल्गुन पोर्णिमा आली.मराठा गडकरी असलेल्या प्रत्येक गडावर
होळी साजरी होत होती.वद्य त्रीतीयेची पहाट, गडावर वाद्ये वाजू लागली ,झानझा झानाणु लागल्या.
तो दिवस सोन्याचा होता, सोनियाचा होता. नद्या ,तारे अग्नी सारेच
आनंदी झाले. जिजाई
पोटी पुत्र जन्माला, हो, पुत्र जिजाईला झाला,
पुत्र शहाजीराजानंना झाला,पुत्र सह्याद्रीला झाला,पुत्र महाराष्ट्राला झाला,पुत्र भारत वर्षाला झाला.
आज तिथीने
शिवाजी जयंती. शासनाची शिवाजी जयंती १९ फेबृवारला असते .पण हिंदवी
स्वराज्जाचा महामेरूची जयंती हिंदवी काळ गणनेनुसार अधिक भावते.
अफझलखानाचा दगा ,महाराजांनी अफझलखानाचा केलेला वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटली तो प्रसंग मावळच्या दर्या खोर्यातील पराक्रम,
पन्हाळ गडाचा वेढा, जावळीचे जंगल, तोरणा, विशालगड, राजगड, रायगड, सिंहगड, गडाशी नाते सांगणारा इतिहास !
पुरंदरचा तह ,मिर्झाराजांशी भेट,औरंजेबाचा दगा, महाराजांना आग्र्यास कैद आणि आग्र्याहून
नेत्रदीपक पलायन.बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे नांव कोणाकोणाची घ्यावी सारीच
अनमोल रत्न.
समर्थ म्हणतात
निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी
यशवंत कीर्तिवंत ! सामर्थ्यवंत वरदवंत
पुण्यवंत आणि जयवंत! जाणता राजा
शिव्रराजांचे आठवावे रूप ! शिव्ररायाचा आठवावा सापेक्ष
शिवरायाचा आठवावा प्रताप! भूमंडळी
शिवरायाचे कैसे बोलणे! शिवरायाचे कैसे चालणे
शिवरायाची सलगी देणे! कैसी असे
सकाळ सुखाचा केला त्याग ! करुनी साधिजे
तो योग
राज्यसाधनाची लगबग! कैसी केली.
शिवाजी महाराज धार्मिक होते, पण धर्म भोळे नव्हते,
कठोर होते, पण क्रूर नव्हते, साहसी होते, पण आतताई नव्हते,
व्यवहारी होते, पण ध्येयशून्य नव्हते,
उच्चध्येयाची स्वप्ने पाहणारा होते पण
स्वप्नाळू नव्हते,
स्वप्न वास्तवात उतरविणारा कठोर
वास्तववादी होता.
परर्धर्म सहीष्णुता होती.
आपण आपल्यासाठी महाराजांचे हे गुण जरी
आत्मसात केले तरी खूप झाले
अजित भिडे
(बाबासाहेब पुरंदरे यास वंदन करून, शिवजयंतीचे स्मरण )
.
