Wednesday, 17 April 2013

थांबा, विचार करा , ह्या देशाला चालवतो कोण ?


       
परवा बँकेत एक बाईहसत हसत कन्नड मध्ये सांगत होती.तिला झिरो बाल्लंस चतखाते उघडायचे होते.ती म्हणालीमी कॅर्रिंग  आहे ” ती कॅर्रिंग आहेहे मला का सागते? मला समजले नाही.नंतर तिने सांगितले तिला सरकार कडून गर्भार रहिल्याबद्दल सबसीडी मिळणारआहे.अनुदान रुपये एक हजार गर्भार रहिल्या बद्दल आणि एक हजार मुल पैदा झाल्यावर.

तिला मी सांगितले झिरो  बाल्लंस बचत खाते उघता येणार नाही.
मी तिला म्हणालो शभर रुपयेभरून खाते उघड ”.ती नवरा घेऊन आली,तो हूज्जात घालू लागला, शभर रुपये भरून खाते उघडायला तयार नव्ह्ता. त्याच्या कडे शिधावाटप कार्ड होतेमतदान कार्ड होते,पण शभर रुपये नाहीत.नंतर तो पंचायात ऑफिसात गेला,तिथून फोन आला सरकारची योजना आहे,

तिला गर्भार राहिल्या बद्दल अनुदान रुपये एक हजार मिळणार आहे.

ज्या माणसाकडे शभर रुपये नाहीत,तो मुलाचे ,संगोपन कसे 
करणार? मुल पैदा करण्यासाठी अनुदान.हिंदुस्थांत लोकशाही आहे, प्रत्येकाला संतती निर्माण करण्याचे स्वातंत्र्य आहे.ही सुविधा दोन मुले होईपर्यंत आहे.हे अनुदान खूपच कमी आहे असे नाही वाटत तुम्हाला
शंभर रुपये भरून खाते उघडण्याची वानवा तिथे,दोन हजार रुपये कुपोषण आणि बाळाची काळजी घेऊ शकेल?

आपली अर्थव्यवस्था किती विचीत्रहे.मेल्यावर सुद्धा लाकडावर केंद्र सरकार सेवा कर घेते आणि मुल पैदा करण्यासाठी सबसीडी.

रात्री पलंगावर झोपलो होतो ,झोप येत नव्ह्ती ,रात्रभर विचार येत होता, देश कुठे चालला आहे बियाणे ,कर्ज ,पेट्रोल,डीएजेल,शिक्षण सारेच अनुदानीत ! 

ह्या देशाला चालवतो कोण सबसीडी ! ! ! 

आपण सारेच संवेदनशील आहोत ,म्हणून हे तुमच्या  बरोबेर share  केले.

अजित भिडे




No comments:

Post a Comment